मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, १५ एप्रिल २०१२ रोजी, दुपारी १२:३० वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि ४ फोटो प्रत्येकी वधु आणि वरासाठी नोंदणीसाठी येताना सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी मंडळांच्या 
विश्वस्तांना संपर्क करा. त्यांचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत. १) अॅड. श्री. जांबुवंत सोनकवडे, औसा रोड, लातूर - ०९४२२०७११७२, २) श्री. पंडित कोंडीबा कावळे, हॉटेल आकाश, चैनसुख रोड, लातूर - ०९०४९१५८४००, ३) श्री. दिगंबर विश्वनाथ खारात्मोल, श्री बालाजी स्क्रॅप मर्चंट, ग्रेन मार्केट, जुने पावर हाउस, लातूर - ०९४२२६३६५५१. तसेच काही संपर्क क्रमांक ढोर डॉट इन संकेतस्थळाच्या Committees विभागात दिलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा