वधु-वर मेळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वधु-वर मेळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ मार्च, २०१२

नाशिक येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन

वीरशैव कंकय्या डोहार समाज मंडळ, नाशिक यांनी रविवार, ०१ एप्रिल २०१२ रोजी 'श्रद्धा' लॉन, गाडगे महाराज पुलाजवळ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याबद्दल अधिकच्या माहितीबद्दल 

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

बारामती (जिल्हा - पुणे) येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन

श्री संत वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळ (अंतर्गत) वधू-वर सूचक समिती, बारामती यांनी रविवार, २५ डिसेंबर २०११ रोजी वसंतराव पवार नाट्यगृह, सांस्कृतिक भवन, सिनेमा रोड, बारामती, जिल्हा - पुणे येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. अधिकच्या माहितीबद्दल श्री. नारायणकर सरांना ०९५४५९९३०२१ या मोबाईल नंबरवर फोन करावा.

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

वार्षिक स्नेहसंमेलन आणि वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे रविवार, २२ जानेवारी २०१२ रोजी वाशी (नवी मुंबई) येथे आयोजन

वीरशैव कक्कय्या समाज मंडळ, नवी मुंबई यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन आणि वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार, २२ जानेवारी २०१२ रोजी नवी मुंबई हायस्कूल सभागृह, सेक्टर १, वाशी (नवी मुंबई) येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. विवाहेच्छुक मुला-मुलींची नोंदणी नि:शुल्क आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. या कार्यक्रमातच गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. गंगाधर शिंदे ९८२०९६६१६६, कार्याध्यक्ष श्री. पुंडलिक खरटमोल ९८६७६९३५२३, सचिव श्री. माणिक दरवेश ९८२०१८१०२१, खजिनदार श्री. नागेंद्र गायकवाड ९९६९१३०८०९ यांच्याशी संपर्क साधावा.

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

शनिवार, २४ डिसेंबर २०११ रोजी वधू-वर मेळावा आणि समाज कार्यकर्ता संमेलनाचे वांद्रे (मुंबई) येथे आयोजन

अखिल भारतीय (ढोर) कक्कय्या महासंघ, कुर्ला, मुंबई आणि अखिल भारतीय वीरशैव कक्कय्या समाज संस्था, कुर्ला, मुंबई यांच्या सहयोगाने सालाबादप्रमाणे वधू-वर मेळावा आणि समाज कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन शनिवार, २४ डिसेंबर २०११ रोजी समाज मंदिर हॉल, खेरवाडी पोलीस स्थानकाच्या समोर, वांद्रे, मुंबई - ४०००५१ येथे करण्यात आले आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी श्री. व्यंकटराव शिंदे ०२२-२०६३११००, श्री. राम कटके ९७६८९६०७५५, श्री. साधू कटके ९८१९७९९६२८ यांच्याशी संपर्क साधावा. या संस्थांच्या इतर विश्वास्थानांही संपर्क करू शकता. त्यांचे फोन नंबर www.dhor.in संकेतस्थळाच्या Committees विभागात दिले आहेत.

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

पत्रावर आलेल्या प्रतिक्रिया

माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रावर अद्याप कोणत्याही मंडळाची लेखी प्रतिक्रिया आली नसली तरी काहीजणांचे फोन मात्र येऊन गेले. पत्रात माझ्याच मोबाईलचा उल्लेख असल्याने मीच सर्व फोन घेतले. या सर्वांशी जवळपास एकसारखाच संवाद झाला. परंतु अहमदनगर जिल्हा ढोर (वीरशैव कक्कय्या) समाज कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कटके यांची प्रतिक्रिया काहीशी वेगळी आणि सुखावणारी होती:

मी : हॅलो.
श्री. कटके : मधुकर सोनवणे बोलत आहेत का?

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

पत्र लिहिण्यामागचा उद्देश

परवा लिहिलेल्या ब्लॉगवरील पत्राचा उद्देश केवळ मंडळांची प्रसिद्धी, वधू-वर पुस्तिकेचा खर्च वाचवणे किंवा घरबसल्या वधू-वर यादी पाहता येणे यापुरताच मर्यादित नाही तर समाजाचा पैसा विधायक कार्यासाठी वळवणे हा आहे.

आज कितीतरी समाजबांधव शिक्षणाविना, मार्गदर्शनाअभावी योग्य प्रकारचे शिक्षण घेऊ शकत नाहीत की योग्य व्यवसाय निवडू शकत नाही. जगात घडणाऱ्या विविध संधींचा फायदा अजूनही आपला समाज घेऊ शकत नाही किंबहुना आपण या संधी शोधूच शकत नाही असे म्हणणे योग्य होईल. कारण काहीही असो त्या खोलात मला आता जायचे नाही. पण यापुढेही आपण असेच झापड लावून जगणार आहोत का? कित्येक शासकीय आणि खाजगी संस्था आर्थिक दुर्बल, पिचलेल्या समाजाला उभारी देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत, याची आपल्याला साधी जाणीवही नाही. आजही मी, माझे कुटुंब

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

वधु-वर मेळावे घेणाऱ्या मंडळांना लिहिलेले एक पत्र

माझे वडील डॉ. श्री. मधुकर मारुती सोनवणे यांनी वधु-वर मेळावे घेणाऱ्या ८-९ मंडळांना ७ मे २०११ रोजी लिहिलेले एक पत्र.


विषय : मंडळाची माहिती इंटरनेटवर टाकणे बाबत.


माननीय महोदय,

गेली अनेक वर्षे आपले मंडळ वधु-वर मेळाव्यांच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम उत्तमरीत्या करीत आहात, हे पाहून आनंद होत आहे. आपल्या या समाजकार्याला माझा थोडाफार हातभार लागावा या हेतूने हा पत्रव्यवहार करत आहे.