शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १२ - प्रा. श्री. भगवान इंगळे

प्रा. भगवान इंगळे हे कक्कय्या समाजातील लेखक आहेत. त्यांनी 'ढोर' 'भिडू' अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. ही दोन्ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलीली आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशा ह्याही प्राध्यापक आहेत व कन्या नीलम ह्या कॅप्टन आहेत. त्यांच्या पुस्तकांचा परिचय खाली करून दिला आहे.

१) 'ढोर' - आधुनिक सुखसोयींमुळे ढोर समाजाचा धंदा पूर्ण बसला व ढोर समाज उद्ध्वस्त झाला. याच ढोर समाजातील एक गट शिकला आणि स्थिर झाला. अशाच एका तरुणाची ही प्रातिनिधिक कहाणी.

२) 'भिडू' - आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील
भयाण वास्तवामुळे अस्वस्थ झालो. काही वेळा प्रभावित झालो. अशा भिडूंची ही जीवनकहाणी ! असेच काही भिडू प्रतिकूल परिस्थितीशी निकरानं झुंजून मार्ग काढत असले, तरी त्यांच्या अंतर्मनातदेखील खोल व्यथा-वेदना आहेत. ही इरसाल मंडळी पूर्वी कशी होती ? आज कुठे आहेत ? त्यांच्या भल्या-बुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा शोध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा