मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांचे समाजबांधवांना आवाहन

विधायक कार्यासाठी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेचे व ई-मेल पत्ते गोळा करण्याचे काम श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई (मोबाईल नं. ०९८६९३८८३०३), यांनी हाती घेतले आहे. नोव्हेंबर १७, २०१२ पर्यंत त्यांच्याकडे बरयाच लोकांचे जनगणनेचे फॉर्म व ७६५ लोकांचे ई-मेल पत्ते गोळा झाले आहेत. श्री. व्हटकर यांच्या कडून सर्व समाजबांधवाना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेसाठी व ई-मेल पत्त्यासाठी श्री. व्हटकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
 
पत्ताः
श्री. विलास नामदेवराव व्हटकर,
चारकोप सरगम सह. गृह. संस्था मर्यादित,

गुरुवार, २६ जुलै, २०१२

असे मिळते जात प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा महत्त्वाच्या वेळेला या प्रमाणपत्राची मागणी होते आणि नेमके हे प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध नसते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रमाणपत्राची आणि विशेषत: निवडणुकीच्या काळातही या प्रमाणपत्राची विशेष आवश्यकता भासते.

हे प्रमाणपत्र कसे मिळविले जाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे करायचा, प्रमाणपत्राची पडताळणी म्हणजे काय याविषयीची माहिती खास वाचकांसाठी...

मंगळवार, २४ जुलै, २०१२

योजना आपल्या दारी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. 

गरीब विद्यर्थ्यांसाठी पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती. 

गरीब मुलींसाठी 3 महिन्यांचा मोफत 'डिप्लोमा ट्रॅव्हल व टुरिझम' अभ्यासक्रम. 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आणि स्त्रियांसाठी IDEMI तर्फे होणारा अभ्यासक्रम सवलतीमध्ये.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

मंगळवार, १० जुलै, २०१२

गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची

श्री. सुखदेव नारायणकर, सांगली यांचा 'गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची' हा लेख 'संत कक्कय्या पत्रिके'च्या 2011 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. दिवाळी अंकाच्या रूपाने काही लोकांच्या वाचण्यात आलेला हा लेख श्री. विलास व्हटकर यांनी ई-मेलच्या माध्यमातून सार्वत्रिक केला. हा लेख समाजाच्या संघटनात्मक बांधणीचा मसुदा आपल्यापुढे सादर करतो. समाजातील सर्वांनी वाचवा असाच हा लेख आहे. त्यामुळे तो ब्लॉगवर टाकण्याची परवानगी श्री. सुखदेव नारायणकर यांना मागितली आणि त्यांनी ती लगेच दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आता हा लेख कायमस्वरूपी राहील आणि सर्वांना वाचता येईल. लेखावर (टिप्पणी मध्ये) प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. तसेच समाजबांधवांकडून समाजासाठी उपयुक्त लेख आल्यास त्यांचाही लेख त्यांच्या नावासकट या ब्लॉगवर टाकण्यात येईल.

शुक्रवार, १५ जून, २०१२

लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

लातूर येथील ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ढोर समाजाच्या वधु-वरांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, 24 जून 2012 रोजी, दुपारी 12:39 वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि

बुधवार, १३ जून, २०१२

दिनोदिन बढता जाये कारोबार - ३

गेल्या ३ महिन्यात कार्यबाहुल्यामुळे जास्त लिखाण होऊ शकले नाही. या दरम्यान लातूर आणि नाशिक मंडळांचे कार्यक्रम, 'लिडकॉम' (LIDCOM) संस्थेची माहिती आणि संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, तसेच संजय सोनवणी यांचा ढोर समाजाबद्दल माहितीपूर्ण लेख ई. ब्लॉग टाकण्यात आले. तरीही वाचकसंख्या टिकून राहिली यातच ब्लॉगचे यश सामावले आहे.

बुधवार, २३ मे, २०१२

ढोर समाजाचा इतिहास

गेल्या ब्लॉग मध्ये संजय सोनवणी यांच्या '......ढोर समाजाचा इतिहास' लेखाबद्दल लिहिले होते. त्यास फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. त्यांच्या या लेखाला कॉमेंट देवून तो लेख माझ्या ब्लॉगवर टाकण्याची परवानगी मागितली होती. ती त्यांनी लगेचच देवून मनाचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा हा लेख लवकरच 'दैनिक नवशक्ती'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या पुढील लिखाणाला हार्दिक शुभेच्छा. तो लेख पुढे दिलेला आहे :


ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास
- संजय सोनवणी

हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक

मंगळवार, २२ मे, २०१२

'संजय सोनवणी' यांचा 'ढोर समाजा'वर माहितीपूर्ण लेख

'संजय सोनवणी' यांचा अल्प परिचय :
मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक. तत्वज्ञ, कवि आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलुंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भुमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. (अधिक वाचा)

संजय सोनवणी हे जून 2010 पासून 'संजय सोनवणी (Sanjay Sonawani)' हा ब्लॉग नियमित लिहितात. यांच्या ब्लॉगवर 10 एप्रिल 2012 रोजी  'ढोर समाजा'वर अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. तो समाजातील प्रत्येकाने वाचला पाहिजे असे मला वाटते. त्या लेखाची  लिंक खाली दिली आहे :

रविवार, २० मे, २०१२

‘लिडकॉम’ची 'बीज भांडवल योजना'

‘लिडकॉम’ (LIDCOM) ची 'बीज भांडवल योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.

बीज भांडवल योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू.50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मिळू शकते. महामंडळ प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 20 टक्‍के बीज कर्ज म्‍हणून

‘लिडकॉम’ची '50% अनुदान योजना'

‘लिडकॉम’ (LIDCOM) ची '50% अनुदान योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.

50% अनुदान योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू. 50000/- कर्ज मिळू शकते व या अर्थसहाय्यापैकी रू. 10000/- कमाल मर्यादेपर्यंत 50% कर्जाची रक्कम

शनिवार, १९ मे, २०१२

‘लिडकॉम’ची 'मुदत कर्ज योजना'

लिडकॉम(LIDCOM) ची 'मुदत कर्ज योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांसअॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

मुदत कर्ज योजना
 
उद्देश :
महामंडळामार्फत, राष्‍ट्रीय अनुसूचित जाती वित्‍त व विकास महामंडळ (NSFDC), नवी दिल्‍ली या महामंडळाच्‍या केंद्र पुरस्‍कृत योजनांचा लाभ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्‍या लाभार्थ्‍यांना देण्‍यात येतो. या अंतर्गत चर्मकार

'लिडकॉम’ची 'सुक्ष्‍म पत पुरवठा योजना'

लिडकॉम(LIDCOM) ची 'सुक्ष्‍म पत पुरवठा योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्डकास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

सुक्ष्‍म पत पुरवठा योजना

उद्देश :
या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील चर्मकार समाजातील लाभार्थ्‍यांना 5 टक्‍के व्‍याज दराने रु.25,000/- पर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते. या रकमेमध्‍ये 50 टक्‍के किंवा रु.10,000/- यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाते व

बुधवार, १६ मे, २०१२

'लिडकॉम'ची 'महिला समृध्दी योजना'

लिडकॉम(LIDCOM) ची 'महिला समृध्‍दी योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना
'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

महिला समृध्दी योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील विधवा, परित्‍यक्‍ता महिला अथवा ज्‍या गावात राष्‍ट्रीयकृत बँका नाही अशा गावावतील महिला लाभार्थींसाठी महिला समृध्‍दी योजनेअंतर्गत कर्ज रक्‍कम रु. १५,०००/- व अनुदान रु. १०,०००/- असे दोन्‍ही मिळून

'लिडकॉम'ची 'प्रशिक्षण योजना'

लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित चर्मकार समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवते. त्यांची थोडक्यात माहिती या ब्लॉगद्वारे क्रमाक्रमाने प्रसिद्ध करणार आहे.

या ब्लॉगमध्ये आपण 'लिडकॉम'तर्फे राबवल्या जाणाऱ्या 'प्रशिक्षण योजने'संबंधी माहिती घेवू.

प्रशिक्षण योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील लाभधारकांना व्‍यवसायासाठी लागणारे तांत्रिक

चर्मोद्योग आणि चर्मकार समाजाच्या विकासासाठी : 'लिडकॉम'

लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच महाराष्‍ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ (Leather Industries Development Corporation of Maharashtra). हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. आता या महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्‍यात आले आहे. चर्मकार समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या या महामंडळाविषयी थोडक्यात प्रस्तावना :

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्‍या सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच राज्‍यात चर्मोद्योगाचा विकास करण्‍यासाठी शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाची स्‍थापना ०१ मे १९७४ रोजी झालेली आहे.राज्‍यात चर्मोद्योग विकासास चालना देणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान

मंगळवार, १५ मे, २०१२

लातूर मंडळातर्फे नि:शुल्क वधु-वर नोंदणी

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने वधु-वर नोंदणीचे कार्य हाती घेण्यात आले आहे. वधु-वर नाव नोंदणी नि:शुल्क होणार आहे. यासाठी इच्छुक वधु-वरांनी आपली सर्व माहिती (नाव, पत्ता, फोन नंबर, जन्मतारीख, उंची, लिंग, शिक्षण, नोकरी, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ई.) आणि पोस्टकार्ड आकाराच्या फोटो सह मंडळाचे विश्वस्त अॅड. श्री. बाळासाहेब कटके आणि श्री. दिगंबर खरटमोल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अधिक माहितीसाठी

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

लातूर येथील सामुदायिक विवाह सोहळा तहकूब

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी रविवार, १५ एप्रिल २०१२ रोजी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा, निवडणूक आणि अन्य काही कारणास्तव तहकूब करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मंडळांच्या विश्वस्तांना संपर्क करा. त्यांचे संपर्क क्रमांक पुढे दिलेले आहेत.

गुरुवार, २९ मार्च, २०१२

नाशिक येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन

वीरशैव कंकय्या डोहार समाज मंडळ, नाशिक यांनी रविवार, ०१ एप्रिल २०१२ रोजी 'श्रद्धा' लॉन, गाडगे महाराज पुलाजवळ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याबद्दल अधिकच्या माहितीबद्दल 

सोमवार, ५ मार्च, २०१२

दिनोदिन बढता जाये कारोबार - २

गेला 'दिनोदिन बढता जाये कारोबार' ब्लॉग लिहून ३ महिने झाले. या ३ महिन्यात बरेच बदल घडले. यादरम्यान श्री. रमाकांत नारायणे यांनी पाठवलेल्या 'कक्कय्या समाज परिचय' ला ब्लॉगवर टप्या-टप्प्याने प्रसिद्धी देण्यात आली. तसेच विविध ठिकाणी होणाऱ्या वधू-वर मेळाव्यांच्या तारखा मंडळांच्या संपर्क क्रमांकासह  ब्लॉगवर देण्यात आले. सर्वच ब्लॉगला समाजबांधवांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या ३ महिन्यात २७२५ वाचकांनी ब्लॉगला भेटी दिल्या. म्हणजे रोज सरासरी ३० लोक हा ब्लॉग वाचत आहेत. तसेच या ब्लॉगची सदस्य संख्या 

शुक्रवार, २ मार्च, २०१२

उचल्यांची 'उचलेगिरी'

वाचकहो,

काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉग वरच्या पूर्वीच्या लेखातले काही शब्दसंच गुगलवर टाकून टाईमपास करत असताना एक लिंकच्या माहितीत माझ्या ब्लॉग वरच्या काही ओळी जशाच्या तशा दिसल्या. कुतूहल म्हणून त्या लिंक उघडून पहिले असता ओळीच नाही तर पूर्ण ब्लॉगच्या ब्लॉग जशेच्या तशे उचलले आहेत. त्यामध्ये फॉन्ट साईझ बदलायची तसदी सुद्धा घेतलेली नाही. नुसती स्टाईलच नाही तर शीर्षकेही जशीच्या तशी उचलली आहेत. हे लिखाण स्वतःचे आहे असे भासवण्यासाठी त्याने ब्लॉग वरच्या माहितीचे डॉक्युमेंट मध्ये रुपांतर करून, त्यावर स्वतःच्या नावाचे लेबल लावून गुगलवर उपलोड केले आहे आणि त्याची डॉक्युमेंटची लिंक स्वतःच्या ब्लॉगवर दिली आहे.

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १५ - कक्केरी

ज्या ठिकाणी शरण कक्कय्या लिंगैक्य झाले त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. समाधीच्या बाजूस कक्कय्यांचे तळे व कक्कय्यांची विहीर सुद्धा आहे. तेथे कक्कय्यांबाबत माहिती देणारा शिलापट सुद्धा आहे व त्याच ठिकाणी कक्कय्यांच्या नावे 'कक्केरी' (तालुका: खानापूर, जिल्हा: बेळगाव, राज्य: कर्नाटक) हे गाव सुद्धा वसलेले आहे. समाधीच्या स्थळी महाशिवरात्रीस मोठी महायात्रा भरते व लिंगायत समाज व कक्कय्या समाज मोठ्या संखेने महायात्रेस हजर असतो. यावेळी सामुदायिक भोजनाचा मोठा कार्यक्रम होऊन प्रसाद दिला जातो. तेथे आपल्या समाज बांधवांनी एक सभागृह, स्नानगृह, स्वच्छतागृह बांधले असून, पाण्यासाठी बोअरवेल खोदली आहे आणि एक जंगम पुजारीही तेथे ठेवला आहे. तेथेच कक्कय्यांच्या पत्नी 'भिष्ठादेवीही' लिंगैक्य झाल्या व त्यांचे मंदिरही

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, १५ एप्रिल २०१२ रोजी, दुपारी १२:३० वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि ४ फोटो प्रत्येकी वधु आणि वरासाठी नोंदणीसाठी येताना सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी मंडळांच्या 

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात 'संत कक्कय्या'

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने 'मराठी विश्वकोश' इंटरनेटवर टाकणे सुरु केले आहे. आतापर्यंत ३ खंड प्रकाशित झाले आहेत. पुढील खंडही लवकरच इंटरनेटवर प्रकाशित होणार आहेत. इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात खंड ३ - सूची ४ मध्ये 'संत कक्कय्या'चा 'कक्कय्य' या नोंदशीर्षकाखाली (विषय - धर्म) नोंद करण्यात आली आहे. त्यातील मजकूर समाज बांधवांसाठी जशाच्या तसा खाली देत आहे. 

कक्कय्य : (सु. १२ वे शतक). कर्नाटकात होऊन गेलेला एक वीरशैव संत. तो जातीने ढोर असून मूळचा माळव्याचा (मध्य प्रदेश) रहिवासी होता. बसवेश्वरांच्या वीरशैव पंथाची कीर्ती ऐकून तो बसवकल्याण येथे गेला व

शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १४ - डॉ. ज्योती व्हटकर

डॉ. ज्योती जयवंत व्हटकर या स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक कै. नामदेव व्हटकर यांच्या नात व लेखक श्री. जयवंत नामदेव व्हटकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी 'मराठा आणि पेशवे कालखंडातील कर्तबगार स्त्रिया' या नावाचे पुस्तक लिहिले असून ते दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. डॉ. ज्योती, 

कक्कय्या समाज परिचय १३ - श्री. ना. म. शिंदे

श्री. ना. म. शिंदे हे लेखक व कवी आहेत. त्यांचे साहित्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले आहे. ते सहायक आयुक्त (भारतीय राजस्व सेवा) होते. 'जातीला जात वैरी' ( पॉप्युलर प्रकाशन, १९९०) या त्यांच्या पुस्तकास राज्य पुरस्कार मिळाला आहे. यांचा काव्य संग्रहही प्रसिद्ध आहे तसेच ते नियमित राजप्रिया अक्षरपान’ हा दिवाळी अंकही प्रसिद्ध करतात. 'उभारणी' हे कक्कय्या समाजाची माहिती देणारे

कक्कय्या समाज परिचय १२ - प्रा. श्री. भगवान इंगळे

प्रा. भगवान इंगळे हे कक्कय्या समाजातील लेखक आहेत. त्यांनी 'ढोर' 'भिडू' अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. ही दोन्ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलीली आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशा ह्याही प्राध्यापक आहेत व कन्या नीलम ह्या कॅप्टन आहेत. त्यांच्या पुस्तकांचा परिचय खाली करून दिला आहे.

१) 'ढोर' - आधुनिक सुखसोयींमुळे ढोर समाजाचा धंदा पूर्ण बसला व ढोर समाज उद्ध्वस्त झाला. याच ढोर समाजातील एक गट शिकला आणि स्थिर झाला. अशाच एका तरुणाची ही प्रातिनिधिक कहाणी.

२) 'भिडू' - आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय ११ - श्री. तायप्पा हरी सोनवणे

कै. ताय्यप्पा हरी सोनवणे हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे खासदार होत. त्यांचा जीवन परिचय खालील प्रमाणे आहे.
१) कक्कया समाजाचे पहिले वकील व खासदार. 
२) जन्म १० सप्टेंबर १९१० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे या गावी अत्यंत गरीब परिस्थितीत झाला. 
३) लहानपणीच इंग्रजी, फ्रेंच शिकून व रात्रशाळेत शिकून मॅट्रिक झाले. 
४) अर्थशास्त्र व राज्यशास्त्र घेऊन बी. ए. व नंतर नोकरी करत असताना वकील झाले. 
५) मुंबईत वकिली शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून कायद्याच्या अभ्यासाचे मार्गदर्शन.

बुधवार, १८ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १० - कु. सोनल सोनकवडे (आयपीएस)

कु. सोनल सोनकवडे या महापारेषणचे मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांची कन्या. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २००६ साली अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांकाने पास होऊन ठाणे येथे उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. त्यांचे २००९ च्या युपीएससी परीक्षेत पास होऊन आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये निवड झाली. पुन्हा २०१० च्या युपीएससी च्या परीक्षेत तसेच मुलाखतीमध्ये निवड होऊन आय पी एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) पदासाठी निवड झाली. तिची आय पी एस साठी निवड होण्याअगोदर 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ती नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

युपीएससी डेडिकेशनची परीक्षा (शब्दांकन: वसुंधरा काशीकर-भागवत)

तुम्ही किती पुस्तकं वाचता यापेक्षा कसं वाचता हे महत्वाचं आहे. युपीएससीमध्ये नेहमीच विश्‍लेषणात्मक (ऍनॅलिटिकल) प्रश्‍न विचारण्यावर भर दिला जातो. त्यामुळे युपीएससी ही आकलनाची परीक्षा आहे. २००९ च्या युपीएससी परीक्षेत चौथ्या प्रयत्नात आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये सिलेक्‍शन झालेली आणि नागपूरमध्ये ट्रेनिंग घेत असलेली सोनल सोनकवडे. बघुयात तिचे अनुभव काय आहेत ते...

कक्कय्या समाज परिचय ९ - ढोर समाजातील आडनावे

ढोर समाजात असलेल्या आडनावांची यादी खाली देत आहे. त्यामध्ये काही बदल असल्यास किंवा आणखी आडनावे असल्यास टिप्पणी मध्ये टाकावीत.

अष्टेकर (Ashtekar), बागलकोटकर (Bagalkotkar), बागले / बगळे (Bagle / Bagale), भालशंकर (Bhalshankar), भोसले (Bhosale), बिदरकर (Bidarkar), बोराडे (Borade), बोरुडे (Borude), बोधने (Bodhane), चांदेकर (Chandekar), चांदोडे (Chandode), चौधरी (Chaudhari), चौगुले (Chaugule), डहाके (Dahake), दरवेश (Darvesh), ढाके (Dhake), दरवेशी (Darveshi), दरवेशकर (Darveshkar), धडके (Dhadke), धनशेट्टी (Dhanshetti), गायधनकर (Gaidhankar / Gaydhankar), गायकवाड (Gaikwad), गजाकस (Gajakas), गजाकोश (Gajakosh), गजाकुंस (Gajakuns), गजरे (Gajre), गणेशकर (Ganeshkar), गरग (Garag), घोडके (Ghodake), हसनाळे / हासनाळे (Hasnale), हौसारे (Hausare), हवाले (Havale / Hawale), होळकर (Holkar), होटकर (Hotkar), हुटगीकर (Hutgikar), इंगळे (Ingle / Ingale), इंगोले (Ingole), जोग (Jog), जोगदंड (Jogdand), जोगदंडे (Jogdande), कदम (Kadam), कडू (Kadu), कळंबे (Kalambe), कल्याणकर (Kalyankar), कटकदौंड / कटकदोंड (Katakdaund / Katakdond), कटकधोंड (Katakdhond),

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय ८ - पहिले व्यक्ती

कक्कय्या समाज्यातील विविध क्षेत्रातील पहिले कोण?

पहिले मॅट्रिक - कै. गंगाधर यशवंत पोळ, कोल्हापूर
पहिले पदवीधर - कै. तुळजाराम अण्णाजी सोनवणे
पहिले न्यायाधीश - कै. तुळजाराम अण्णाजी सोनवणे
पहिले वकील - कै. ताय्यप्पा हरी सोनवणे, सोलापूर
पहिले खासदार - कै. ताय्यप्पा हरी सोनवणे, सोलापूर
पहिले युनोत भाषण - कै. ताय्यप्पा हरी सोनवणे, सोलापूर
पहिले आमदार - कै. गणपतराव देवजी तपासे, सातारा
पहिले मंत्री - कै. गणपतराव देवजी तपासे, सातारा
पहिले राज्यपाल - कै. गणपतराव देवजी तपासे, सातारा
पहिले मुख्यमंत्री - मा. सुशीलकुमार शिंदे, सोलापूर
पहिल्या महिला आमदार - सौ. राधाबाई श्रेयकर, बेळगाव
पहिल्या महिला खासदार - सौ. रत्नमाला सावनूर, बेळगाव
पहिल्या महिला केंद्रीय मंत्री - सौ. रत्नमाला सावनूर, बेळगाव
पहिल्या महापौर - सौ. निर्मला बाबुराव सावळे (मीरा भाईंदर महानगर पालिका)
पहिले नगराध्यक्ष - श्री. अशोक तपासे (सातारा नगरपरिषद)
पहिले चित्रपट निर्माते - कै. नामदेवराव व्हटकर, कोल्हापूर
पहिले चित्रपट दिग्दर्शक - कै. नामदेवराव व्हटकर, कोल्हापूर
पहिले मुख्य अभियंता - श्री. आनंदराव गंगाधर पोळ, कोल्हापूर
पहिले सिव्हील सर्जन - डॉ. सीताराम चौगुले
पहिल्या महिला डॉक्टर - डॉ. विमल कदम, बेळगाव
पहिले वैमानिक - श्री. दीपक गजरे
पहिली महिला वैमानिक - कॅप्टन नीलम भगवान इंगळे

वरील यादी पहिले इंजिनिअर, पहिले डॉक्टर, पहिले IAS, पहिले IPS, पहिले नगरसेवक, पहिले सरपंच, पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी, पहिले कॅलेक्टर, पहिले Phd, पहिले सचिव अश्या प्रकारे वाढवता येईल. आपणास अधिक माहिती असल्यास तपशिलासह कळवा. ती समाजाला अतिशय प्रेरणा देणारी आहे. वरील महितीत काही बदल असल्यास मला टिप्पणीद्वारे जरूर कळवावे.

कक्कय्या समाज परिचय ७ - श्री. राजकुमार व्हटकर (आयपीएस)

श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) हे सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत. त्यांची 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. तुम्हाला ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर (शब्दांकन: श्री. मनोहर भोळे)
 
दहावीत केवळ ५३ टक्के, बारवीत ७० टक्के, बी. कॉम. मध्ये ६६ टक्के, तर एमबीएमध्ये ६६ टक्के गुण. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील ही सर्वसाधारण प्रगती. बारावीपर्यंतचे शिक्षणही ग्रामीण भागात झाले. पहिली ते चौथी फलटणच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये. पाचवी ते दहावी येथील मुधोजी हायस्कूलमध्ये. या व्यक्तिमत्त्वाचा राजकुमार व्हटकर हा एक सामान्य विद्यार्थी ते भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी हा प्रवास तसा रोमांचक आहे. 
 
बी. कॉम. होईपर्यंत पुढे काय करायचे, हे माहीत नव्हते. ठरले नव्हते. बी.कॉम. संपत आले, मग मुले करतात म्हणून आपणही एमबीए करू म्हणत बी. कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असताना एमबीएची प्रवेश परीक्षा दिली. यथावकाश भारती विद्यापीठात प्रवेशही मिळाला. पुण्यातील भारती विद्यापीठातून एमबीए पूर्ण झालेसुद्धा. आता या वेळेपर्यंत यूपीएससी म्हणजे काय असते, याची अजिबात कल्पना नव्हती. वडिलांचा घरी चामड्याचा व्यवसाय. आपल्या एमबीए ज्ञानाचा उपयोग करून आपण आधुनिक पद्धतीने या व्यवसायाचा विस्तार करू, यातच स्वतःचे करिअर करू, अशी या वेळेपर्यंतची मनाची तयारी होती; पण...
 
"तू यूपीएससी पास होऊन स्वतःची लायकी व कर्तृत्व सिद्ध कर. तुला सरकारी नोकरी करायची नसेल तर नको करू, पण तू पोस्ट मिळवू शकतोस ही बाब सिद्ध करून तर दाखव !'' या वाक्‍याने एक वादळ उठले, जे थेट आयपीएस झाल्यावरच शमले. नातलग डॉ. विजयालक्ष्मी सोनवणे यांची ही आव्हानात्मक भाषा होती. ही गोष्ट आहे १९९५ या वर्षाची.
 
एमपीएससी व यूपीएससीचा एकत्रित प्रयोग खूप कमी जण करतात. दोन्ही दगडीवर हात नको, सटकलो तर खोल दरीत कोसळू, अशी भीती मनात असते. व्हटकर यांनी मात्र हा प्रयोग यशस्वीपणे सिद्ध केला. अगदी वेगवेगळे ऑप्शनल विषय ठेवून. एमपीएससीसाठी बॅंकिंग आणि अकाऊंट्‌स तर यूपीएससीसाठी पूर्वपरीक्षेला कॉमर्स, मुख्य परीक्षेला इतिहास व मराठी वाङ्‌मय. एकूण पाच विषय ही स्वारी एकसाथ हाताळत होती.
 
डोक्‍यात या विषयाचे फ्यूजन कसे काय नाही झाले, ते यांनाच माहीत. १९९५ ला एमपीएससीतून कक्ष अधिकारी, तर १९९६ या वर्षी लेखा अधिकारी वर्ग-१ म्हणून निवडही झाली. शिवाय या दोन्ही वर्षी यूपीएससीची पूर्वपरीक्षाही पास होण्याची किमया घडली. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे. ठरले ते ठरले. आता मागे नाही हटायचे. "लायकी सिद्ध करण्यास...' हे वाक्‍य सतत डोक्‍यात घुमायचे. पद मिळाले पाहिजे बस्स ! शेवटी इप्सित साध्य झाले. एमपीएससीतून का होईना, दोन पदे मिळाली. तसे पाहता हे आव्हान कधीच पार करून झाले होते.
 
स्वतःचे दोष हेरून त्यावर स्वतः उपाययोजना करण्याची पद्धत प्रचंड यश देऊन गेली. माणूस स्वतःच स्वतःचा उत्तम परीक्षक असतो, हा अलिखित नियमच सिद्ध झाला. या सगळ्या कष्टाची परिणती यूपीएससीची मुख्य परीक्षा पास होण्यात झाली. आत्मविश्‍वासाच्या कक्षा रुंदावल्याने क्षितिजापलीकडील यशाची चाहूल लागली. संधी हातची गेली नाही पाहिजे. पाहिजे तेवढे कष्ट करू पण सिलेक्‍शन झाले पाहिजे, या निर्धारातून दिल्लीवर आक्रमणाची मोहीम आखली गेली. ती यशस्वी झाली.